Posts

डोह - 3

विचारमग्न अवस्थेत मी बुडलो होतो ..... या घटनेचा माझ्या पूर्व आयुष्याशी काही संबंध असेल का ? हा प्रश्न मला सारखा पडत होता...रात्रीचे ९.०० वाजले होते... बाहेर पाउस पडत होता ... मनस्थिती खराब असल्यामुळे मी घरातच बसून होतो .. वार्याचा सळसळ वाढली होती ……....बाहेरच्या रस्त्यावरील दिव्याचा प्रकाश पडत होता ....... मी पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होतो ... पण पावसाचा जोर वाढला .... मुसळधार पावसाचा तो आवाज... माझ लक्ष विचलित करत होता… तेवढ्यात आईचा आवाज "आला नीरज जेवायला ये" ... मी पुस्तक तिथेच टाकून खाली गेलो ……. बाबा समोर आजीच्या बाजूला बसले होते …… निशांत व आई माझ्या बाजूलाच बसले होते .... जेवता जेवता बाबां म्हणाले … "नीरु, ठीक वाटतंय  ना तुला आता" ? मी हो म्हंटल … आतून खूप अस्ताव्यस्त परिस्थिती झाली होती .. विषय बदलावा म्हणून आई लगेच म्हणाली..... "तुला बरं वाटत असेल तर तू college join  कर", मी मान हलवली..... पूर्ण वेळ मी शांतच होतो …  कारण काही बोलण्याच्या मनःस्थितीत    नव्हतो मी ... वर झोपयला गेलो ……. खूप वेळ झाला पण झोप येतच नव्हती … मनाला परत त्या समुद्राच

नो स्मोकिंग

नो स्मोकिंग : गोष्ट सुरु होते ते, कडेगाव तालुक्यातील लहान श्या गावातील । कडेपूर हे तसं शहरगाव, पण त्याच जवळ भाळवणी नावाचे एक लहानसे गाव आहे .  या गावाची ओळख म्हणजे, इथे भरणारा बाजार, शेतातली ताजी फळे, भाज्या एवढंच न्हवे तर विविध प्राण्यांचा सुद्धा बाजार भरतो बैल,बकरी वगैरे. बऱ्याच गावातून लोकं इथे बाजाराला यायचे कडेपुरात एक शेतकरी राहत होता, त्याचे नाव मनोहर. मनोहर दिवसभर शेतात राबायचा, त्याची बायको घर सांभाळायची। अधूनमधून बाजारानिम्मित त्याला भाळवणी ला जाव लागायचं.  भाळवणी गावावरून परती  ची शेवटची एस. टी. ती संध्याकाळी ७ ची. ही एस. टी.चुकली तर चालत येण्याशिवाय पर्याय राहत नाही.  मनोहर ने शेतातला उस विकून नुकत्याच आलेल्या मिळकतीत शेळ्या घ्यायचे ठरवले. जेणे करून त्याच्या संसाराला हातभार लगेल.  मनोहर ने बायकोला विचारलं तिने सुद्धा समंती दिली . शेळ्या विकत घेण्यासाठी एके दिवशी मनोहर भाळवणी च्या बाजाराला जायला निघाला. शेवटची एस टी चुकावाल्यास रात्री परत यावा लागणार ह्याची कल्पना असल्यामुळे त्याने battery आणि त्याची आवडती बीडी घेतली होती सोबत. शेतातली राहिलेली कामं आवरून

डोह - २

डोह - २            आता मी शुद्धीवर आलो होतो. सगळं नॉर्मल वाटतं होतं.  डॉक्टर कुलकर्णी माझ्या समोर बसले होते.  डॉक्टर म्हणाले "आता कसं वाटतंय ?".  मी म्हणालो  "मी इथे कसा आलो डॉक्टर? मला प्लीज सांगा हे काय चालू आहे ?" ते म्हणाले  "शांत हो, नीरज.. , मी तुला सर्व सांगणार आहे ..... relax " …. "तू इथे आलास तेव्हा तू बेशुद्ध होतास, तू बस मध्ये बसला असताना …….तू झोपी गेलास ....... नंतर बस ड्रायवर ने तुला उठवण्याचा प्रयत्न केला ...  पण काही उपयोग झाला  नाही ...  शेवटी त्याने तुला इथे admit केले ....... आम्ही तुझ्या नातेवाइकाना inform केलंय ते इतक्यात पोहचले सुद्धा असतील ........" डॉक्टर जणू काहीच घडलं नव्हत अस दाखवत होते . त्यांनी डोळ्यांवरचा चष्मा काढला ........ आणि बाजूच्या टेबल वर ठेवत म्हणाले .......  "नीरज , dont worry मला सांग काय झालं होतं तुला ?" डॉक्टरांच्या ह्या प्रश्नांवर मी काय उत्तर देऊ तेच सुचत नव्हत ....... मी आठवायला लागलो ....... माझा चेहरा पाहून डॉक्टर म्हणाले  "राहू दे नीरज तू आता आराम कर मग आपण बोलू " अस म्हणत ते

डोह - १

डोह - १ उसळत्या लाटांमधून वाट काढत ..... माझी नाव चालली होती … आकाश तांबडं होत... पाऊस पडत नव्हता ... पण ऐकून सार वातावरण भयानक होत होतं .  तोंडावर उसळणार्या पाण्यामुळ डोळे मधून मधून बंद होत होते ... दूर दूर वर काहीच नव्हत … होता तो फक्त उसळणारा भयानक समुद्र ... जलद गतीने वाहणारा तो वारा … काही सुचण्या पलीकडची परिस्थितीत मी अडकलो होतो……. मनाशी केलेला निर्धार ढळला होता .... निसर्गाच्या तांडवा पुढे आपला टिकाव लागणं मुश्किल वाटतं होतं … लाटांचा तो येउन नावेवर आदळण्याचा आवाज डोक सुन्न करत होता … आणि मधेच … अचानक … वळून पाहिलं  तर … डावीकडे दूर काहीतरी दिसलं … अस्पष्टस काहीतरी …काही सावल्या होत्या … का अजून काही … अंधुक दिसायला लागलं । मोठ्या मोठ्या दोन मुर्त्या … अचानक सगळ शांत झाल... कुठेच लाट नाही ना तो भयानक समुद्र … अजून मी नावेतच होतो … पण पाणी शांत होत … वार्याची मंद झुळूक … अंगांगाला स्पर्शून गेली ...  पण माझ लक्ष कुठेच नव्हत … ते एकवटल होत त्या दोन मुर्त्यांवर ..... विशालकाय दोन मुर्त्या … अजून नीटसं दिसत नव्हत…. सूर्यप्रकाशामुळे त्या मुर्त्यांवर सावली आली होती …मागे तांबडं

गर्द काळोख्या निशेला

Image

तेजस्वी सुर्यतारा...

Image

दूर रानात ..

Image